Thursday, August 6, 2020

तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करायाच्या उपाययोजना





डाळिंबावरील तेल्या:

  • डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही.
  • कुणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे.
  • मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो. 
  • तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात.

  • तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त झाले असताना अतिरिक्त फवारणीवर फवारणी करून झाड अजून कोमात घातले जाते. परिणामी रोगाचा प्रसार थांबण्याऐवजी तो वाढतच जातो.
  • लोक फवारणीवर जास्तीचा जोर देतात पण ड्रिपवाटे झाडाला अगदी कमी प्रमाणात खते देतात. म्हणजे फवारणीसाठी घेतलेल्या औषधांच्या १०% खर्च सुद्धा आपण ड्रीपवाटे सोडायच्या औषधांवर करत नाही. म्हणजे आपण डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर सांगतात औषध थोडे स्ट्रॉन्ग आहे, जेवण करा आणि मग घ्या .मग इथे झाडांना ड्रिपवाटे काही न देता सर्र एक स्ट्रॉन्ग फवारे मारले जातात.
  • काही शेतकरी पाहिले आहेत कि ज्यांचं ड्रिपच वेळापत्रक ठरलेले आहे. फवारणी ते परिस्थिती पाहून करतात. पाण्याचं सिंचन अगदी मापात करतात .रोज नियमित वेळेवर सिंचन आणि ड्रीपवाटे कोणते खत कधी द्याचे, किती प्रमाणात द्यायचे याचा सर्व हिशोब धरणाऱ्या अशा काही शेतकऱ्यांच्या बागेत एकही झाड मर रोगाने गेलेले नाही .किंवा आमच्या बागेत तेल्या रोगाचे फळ आणून टाका. आम्हाला आमच्या झाडांवर ग्यारंटी आहे, कि ते तेल्या रोगाला बळीच पडणार नाहीत..स्वतःच्या झाडांवर एवढा विश्वास असणारे पण खूप शेतकरी आहेत. म्हणजे एखाद्या अशक्त माणसाला रोगांची लागण लवकर होते पण आठवड्यात काही ना काही पौष्टिक खुराक खाणाऱ्या पहिलवान माणसाला रोगांची लागण लवकर होत नाही. आता आपल्याला आपली झाड पहिलवान करायची कि अशक्त ठेवायची हे आपल्या हातात...!
  • तेल्या रोगाचा खूपदा बाऊ डाळिंब बागायतदार लोकांमध्ये करून दिलेला आहे...याला ज्यांनी नवीन जे नवीन डाळिंब बागायतदार आहेत ते घाबरून जातात...या उलट जवळे कडलग,संगमनेर मधील बरेच शेतकरी ज्यांनी राहुरी डॅम लगत आद्रतेच्या भागात शेती घेतली आहे ते १०-१५ वर्षांपासून तेल्याची लागण असलेल्या ४०-५० एकराच्या बागा सांभाळून त्यातून भरघोस उत्पन्न घेतात. 
  • तेल्या रोगासाठी आपला सिंचन, ड्रिपवाटे खते, योग्य फवारणी, बागेतील स्वच्छता इत्यादींमधील ढिसाळपणा कारणीभूत ठरतो. तर रोगाची लागण होऊ नये..व झालीच तर योग्य व प्रामाणिक सल्ल्याचा अभाव इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात.
तेल्यासाठी पूर्व उपाययोजना:
  • तेल्यामुक्त रोपांची लागवड करा. २ रुपयांनी स्वस्त भेटतात म्हणून कुठूनही रोपे घेऊ नका. खात्रीच्या ठिकाणी रोगमुक्त रोपे घ्या. 
  • तेल्यायुक्त झाडांसाठी आपण योग्य बाहेर पकडावा. जेणेकरून पावसाळ्याआधी आपली बाग हार्वेस्ट होऊन जाईल.
  • डाळिंब बागेत योग्य व मातीच्या प्रकार, वाफसा नुसार योग्य सिंचन करा. 
  • डाळिंब बागेत ड्रिपवाटे खतांची योग्य मात्रा द्या. नत्रयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रवे, स्टिमुलंट्स चा वापर करा. त्यासाठी योग्य असे वेळापत्रक बनवून घ्या.
  • NPK युक्त खते वापरा. फवारणीच्या औषधांच्या खर्चाच्या १०% खर्च तरी ड्रिपसाठीच्या खतांसाठी करा. जेणेकरून झाड एकदम सशक्त राहील. 
  • ड्रीप साठी खते देताना खर्चात बचत करू नका. योग्य त्या प्रमाणातच डोसेस देत चला. 
  • बागेत १००% स्वच्छता ठेवा. हवा खेळती राहील याची काळजी घ्या. 
  • फवारणी परिस्थिती पाहून करा. भर उन्हात फवारणी टाळा, तसेच स्ट्रॉन्ग फवारे मारताना बागेला काही वेळ ड्रिपमधून पाणी द्या. 
  • खोडाला बोर्डोपेस्ट, छाटणीनंतर बोर्डो इत्यादी गोष्टी पाळत चला. 
  • ड्रिपवाटे जीवामृत, घरघुती तयार केलेल्या स्लरी इत्यादी कमी खर्चिक गोष्टी वापरत चला.
  • १००% शुद्ध निंबोळी पेंड, उत्तम कुजलेले खत व पॅसिलोमायसिस तसेच ट्रायकोडर्मा बुरशी एकत्र करून ८ ते १० दिवस त्यावर गुळाचे पाणी शिंपडून मग ,असे खत बागेला भरा. याने जमिनीतील जवळपास सर्वच बुरशीजन्य रोगांचा(मररोग,निम्याटोड) नायनाट होईल. या सर्व पूर्वउपायांमधील ड्रीपचे वेळापत्रक, सिंचन आणि स्वच्छता या तीन गोष्टींकडे मुख्यत्वे ध्यान द्यावे.
तेल्या आल्यानंतर उपाययोजना:
  • तेल्या आल्यांनतर कॉपरयुक्त फवारे ( कोसाइड, ब्लायटॉक्स, ब्लू कॉपर ) अधिक स्ट्रॅप्टोसायक्लीन ची योग्य प्रमाणात फवारणी करावी. 
  • कॉपर, कॅप्टन, कर्झेट, ताकत, स्कोर+कवच, कस्टोडिया इत्यादी फवारणी आलटूनपालटून घ्यावी. 
  • बागेत ४% कॉपर डस्ट ची धुरळणी करावी. 
  • बागेला अतिरिक्त सिंचन करणे टाळावे. मोकळे पाणी देणे टाळावे.
  • पावसाळ्यात फळछाटणी लवकर करून घ्यावी. व लगेचच १% बोर्डो ची फवारणी करून घ्यावी.
  •  तेल्या हि फवारणी घ्या .सुडोमोनास + बॅसिलस ...तेल्यासाठी अत्यंत प्रभावशाली अशी हि फवारणी. सुडोमोनास आणि बॅसिलस हे जिवाणू तेल्याच्या व अन्य अपाय करणाऱ्या बुरशींना खातात. पावसाळी आद्र्तायुक्त वातावरणात या जिवाणूंची खूप चांगली अशी वाढ होते. त्यामुळॆ केमिकलयुक्त फवारणीपेक्षा हि फवारणी अत्यन्त फायदेशीर ठरते. फक्त हि फवारणी अत्यन्त काळजीपूर्वक पद्धतीने बनवावी. फवारणीसाठी किती पाणी लागते या हिशोबात.. सुडोमोनास ५ मिली/लिटर व बॅसिलस २ मिली/लिटर या प्रमाणात वापरावे.
फवारणी तयार करायची पद्धत : 
  • फवारणीचा हिशोबात सुडोमोनास एक १० लिटर पाण्यात टाकावे त्यात १ लिटर ताक व अर्धा किलो गुळ टाकावा. तसेच बॅसिलस दुसऱ्या एका १० लिटर पाण्यात टाकावे व त्यात पण १ लिटर ताक व अर्धा किलो गूळ टाकावा. (ताक व गूळ जिवाणूंसाठी अन्न म्हणून काम करतात, व त्यांची संख्या झपाट्याने वाढविण्याचे काम करतात) वरील दोन्ही द्रावाने सावलीत, हवेशीर ठेवावी.फवारणीची टाकी माती टाकून स्वच्छ धुवून घ्यावी. 
  • २४ तासांनंतर फवारणीचा टाकीमध्ये दोन्ही १० लिटर जिवाणू द्रावणे टाकावीत. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे व फवारणी करावी. १५ दिवसांच्या अंतराने याच्या दोन फवारणी घेतल्याने तेलासाठी प्रदीर्घ असा परिणाम या फवारणीने मिळते. अगदी वाजवी दरात हि फवारणी होते. फक्त सुडोमोनास व बॅसिलस हे ताजे जिवाणू औषधे घ्या. व वरील पद्दतीने औषध तयार करा.
  • तेल्यासाठी अनेक प्रकारचे बिनकामी औषधे, पोषक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण योग्य सिंचन, ड्रिपवाटे योग्य खते, बागेतील स्वच्छता या गोष्टींची काळजी आपणच घेतली पाहिजे. विविध महागडी औषधे फवारणी करण्यापेक्षा तेवढ्या किमतीचे योग्य NPK खते, बायोस्टिम्यूलंटस बागेला ड्रीपवाटे देत चला, जेणेकरून आपले झाडे सशक्त राहून, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते अशा रोगांना बळीच पडणार नाहीत.
  • निराश होऊन तेल्यायुक्त बाग उपटण्यापेक्षा योग्य असा बहार धरून, वरील प्रकारे नियोजन करत चला अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पन्न तुम्हाला यातून मिळेल यात कुठलीही शंका नाही....!!

तेल्या ग्रस्त बागेत डाळिंब तडकते असली तर  फवारणी: 

1)कॉपर १.५ ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर घ्या.

2)कॅप्टाफ १.५ ग्राम + कॉन्टाफ १ मिली प्रति लिटर घ्या. 

3)सुडोमोनास + बॅसिलस ची फवारणी देखील फायदेशीर राहील. 

  • वरील फवारणी करताना बागेला चांगल्या प्रमाणात ड्रीपने पाणी द्यावे व संध्याकाळच्या वेळेत शक्यतो फवारणी घ्यावि.पाणी देताना ते वाफसा स्थितीत द्यावे..पाटपाणी देणे टाळावे.
  • शेजारी तेल्याग्रस्त बाग असेल व त्यातही काही उपयुक्त फवारणी दोन्ही बागांत किंवा शेजारील तेल्याग्रस्त बागेत नसेल तर तेल्याचा प्रादुर्भाव वाढणे साहजिक आहे.
उपाययोजना करुनही रोगाचं प्रादुर्भाव वाढलाच तर खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ घालावा व तोटा अधिक प्रमाणात होत असेल झाडे काढून टाकून मध्ये एक दोन पिके घेऊन परत सशक्त डाळिंब झाडांची लागवड केलेली फायदेशीर राहील.

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन कसे करावे.


विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन:



  • विश्रांतीच्या काळात बागेची काय काळजी घेतली पाहिजे या विषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली...लिखाण करून संपवावा असा हा विषय नाही..पण खाली काही फवारणी व आणखी काही नियोजन सांगितले आहे...ते नीट अवलंबले तर निश्चितच चांगली फळधारणा होण्यास काहीही अडचण येणार नाही...!!
  • आधीच्या बहार मध्ये फळ निघून गेल्याने झाडांतील जवळपास सर्वच ताकत निघून गेलेली असते,परिणामी झाडाच्या काडीतील अन्नद्रव्ये स्टोरेज पूर्णतः संपलेले असते.
  • अशा वेळी फळ निघून बाग ताणावर सोडायच्या आधी झाडाला NPK खतांची योग्य अशी मात्रा द्यावी, जेणेकरून झाडात परत ताकत निर्माण होईल.
  • काही शेतकरी एकदा बागेतील फळ निघून गेले कि परत पुढची पानगळ करायच्या वेळीस बागेत येतात. मित्रहो असे ढिसाळ नियोजन चालत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर बाळंतीण बाई 9 महिने बाळ आपल्या पोटात वाढविते..त्याच्या पोषणावर तिची सर्व ताकत खर्च होते..व डिलिव्हरी झाली कि आपण तिला खारीक खोबरे..इतर पोषणहार खाऊ घालतो जेणेकरून तिची कमी झालेली ताकत पुन्हा भरून येईल...मित्रहो इथे डाळिंबाचे झाड म्हणजे बाळंतीण आणि डाळिंब म्हणजे तिने 7 महिने सांभाळले बाळ....सांगायचं मतितार्थ एवढाच कि झाडाने सुद्धा 7 महिने स्वतःची ताकत खर्च करून डाळिंब सांभाळले आहे..त्यामुळे डाळिंब उतरून गेल्यावर सुद्धा झाडांना पोषणहार दिला गेलाच पाहिजे.
  • पानगळीनंतर झाडांनी फुटवा जास्त प्रमाणात फेकणे..फुले न निघने...निघालेल्या फुलांची ड्रॉपिंग होणे..मादीफुल न निघता नर फुलंच जास्ती प्रमाणात निघणे..हि सगळी डाळिंबाच्या काडीत कमी स्टोरेज असण्याची लक्षणे आहेत..!!

1) त्यामुळे आधीचा बहार संपल्यानंतर किंवा नवीन बहार सुरु करायच्या आधी झाडाला कमीत कमी एकरी 2 बॅग 18/46/00 व 1 बॅग 10/26/26 तरी टाकावी.
2) विश्रांती काळात 00/52/34-5ग्रॅम प्रति लिटर अधिक 00/00/50-5ग्रॅम प्रति लिटर ची फवारणी महिन्यातून एक दोन वेळा करावी. फुटवा कमी धावावा तसेच काडीतील स्टोरेज साठी हि फवारणी उपयुक्त ठरते.
3) विश्रांती काळात एखादया दोन साधी बुरशीनाशके/बोर्डो तसेच कीटकनाशकांची फवारणी करावी.
4) नवीन बहार धरायच्या आधी शेणखत टाकलेले खड्डे उकरून घ्यावे व जुन्या मुळीचा जारवा तुटेल या मापात खड्डा करावा.
5) चांगले कुजलेले शेणखतच बागेला भरा. शेणखत भरायच्या आधी त्यावर ट्रायकोडर्मा इत्यादी बॅक्टरीया वाढवून असे खत बागेस भरावे.
6) विश्रांती काळात झाडावरची सर्व फुले फळे तोडून टाकावीत.
7) बहार सुरु करायच्या आधी झाडाच्या खोडांना घेरू पेस्ट चोळून द्यावी.
 बाग लीक होऊन त्याला नवीन पालवी फुटायच्या आत छाटणी करून पानगळ मारून टाकावी.
9)चांगला फुलोरा निघणे व बागेचे पुढील नियोजन हे 80% छाटणीवर अवलंबून असते त्यामुळे छाटणीसाठी 2 रुपये जास्ती जाऊद्या पण छाटणी करणारे प्रशिक्षितच पहा...नाहीतर 2 रुपये झाडाने स्वस्त छाटणी घेणारे 2 मिनिटात जी काडी तयार होण्याला 2 वर्ष लागली अशी काडी छाटून टाकतात. त्यांच्या डोक्यात छाटनी कमी पण झाडाची छत्री कशी होईल एवढेच बघतात.
म्हणून ज्यांना छाटणीमध्ये कोणती काडी ठेवायचीय कोणती काढायचीय हे कळते अशेच छाटणीवाले बघा.

10) विश्रांती काळात फळ उतरून गेला कि लगेच झाडाचे पाणी तोडू नका. शेवटी जर चार तास पाणी चालत होते तर काही दिवस साडेतीन तास नंतर तीन तास नंतर दोन तास नंतर एक अर्धा असं करत पाणी तोडा. साधारण बागेला 45-60 दिवसाचा ताण दिला तर योग्य राहील.

11) पानगळ करायच्या एक महिना आधी खाली सांगितलेली फवारणी 5 दिवसांच्या अंतराने 3 वेळा मारा. अतिशय उत्कृष्ट असे रिजल्ट तुम्हाला कमी फुटवा, मादीफूलांची संख्या जास्त,कमी फुल ड्रॉपिंग, व फुलांचा स्ट्रोक चांगला या स्वरूपात जाणवतील.
  1. गूळ - 5ग्रॅम/लिटर.
  2. DAP - 4ग्राम/लिटर.
  3. 13/00/45- 3ग्राम/लिटर.
  4. कॅल्शिअम नायट्रेट- 2ग्राम/लिटर.
  5. सल्फर - 1ग्राम/लिटर.
  6. बोरॉन - 0.5ग्राम/लिटर.
  • वरील औषधे वरील प्रमाणातच वरील क्रमानेच टाकीत टाकावीत. प्रमाण व औषधांत तसेच टाकीत टाकण्याच्या कर्मात कुठलाही बदल करू नये . तयार झालेला साका 5 दिवसांच्या अंतराने 3 वेळा फवारणी घ्यावी व नंतर पानगळ करावी.
  • वरील प्रमाण हे एकवेळच्याच फवारणीचे आहे. म्हणजे पुढील फवारणीच्या वेळी वरील औषधे वरील प्रमाणात टाकून नवीन साका तयार करावा.
  • तसेच वरील औषधांपैकी १८/४६ जेवढ्या प्रमाणात लागणार असेल तेवढेच फक्त आधीच्या दिवशी भिजत ठेवावे, बाकी औषधे फवारणीच्या वेळी त्या दिवशी टाकले तरी चालेल.

12) इथ्रेल ची योग्य प्रमाणात फवारणी करावी. ज्या बागांना पानगळ आधी जास्त ताण असेल त्यांनी पानगळ फवारणीच्या दिवशी बागेला 15-25 मिनिटे पाणी सोडावे.ज्या बाग पानगळ दिवशी देखील ४०-५०% पाने शिल्लक आहे त्यांनी पानगळ दिवशी पाणी देण्याचे गरज नाही.

  • विश्रांती काळात अनारकिंग नवसंजीवनीचा वापर केला तरी चालेल, त्याने विश्रांती काळात जे डोस टाकलेले आहे त्यांचे अपटेक होईल व काडीतील स्टोरेज वाढत जाईल. नियोजन असे असावे कि ज्यावेळी डोस टाकून, नवसंजीवनी देऊन खतांचे अपटेक वाढेल...व काडीतील स्टोरेज वाढून मग अतिरिक्त स्टोरेज फुटव्यांवाटे बाहेर पडेल त्यावेळी विश्रांती काळातील फवारणी चालू करून मग ते फुटवे वाढ थांबून मग काडीकडे स्टोरेज वळवले जावे.
  • त्याआधीच तुम्ही विश्रांती काळातील फवारणी चालू करू नये. बागेला/झाडांना बाग खाली झाल्यानंतर थोडा मोकळा वेळ द्यावा,त्यांना त्यांच्या कलाने थोडे वाढू द्यावे त्यांतील स्टोरेज वाढून द्यावे व मग नंतर फवारणी चालू करा म्हणजे स्टोरेज योग्य पद्धतीत वाढेल. 

डाळिंब शेतीवरील सततच्या व अवकाळी पाऊसाने उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना


डाळिंब शेती सततचा व अवकाळी पाऊस

सततच्या तसेच अवकाळी पावसामुळे डाळिंब शेतीत अमाप नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी काही उपाययोजना.

१)पानगळ करणे-

शेतकरी पानगळ करत असताने अनेक समस्यांना सामोरे जातात सततचा पाऊस असल्या कारणाने अनेक वेळा पानगळ पाहिजेतशी होत नाही. 

पानगळ हि पावसाळ्यात 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर या दरम्यान करतात. बरेच शेतकरी सप्टेबर मध्ये पाणी देतात. बऱ्याच शेतकऱ्यांची पानगळ यादरम्यान राहून जाते.



पानगळ उपाययोजना :-

  • डाळिंब बागेचे पाने जर 25-30% पेक्षा जास्त बाग लिक झाली नसेल तर पानगळ त्यादरम्यान केली तरी चालेल. 
  • बागेला पूर्ण विश्रांती दिलेली असेल तर पानगळ करताने पाण्याचे व इथ्रेल चे प्रमाण वाढून घावे व पानगळ करावी.
  • काही बागा लिक होऊन 30% पेक्षा जास्त नवीन पाने निघाली असतील व फुले निघण्याची काही शक्यता नसल्यास एक महिना ते दीड महिना थांबून पानगळ करून घ्यावी.
  • जर बागेची पानगळ  न करता  पालवी निघाली असेल व फुलकळी काही प्रमाणात दिसत असेल तर त्यासाठी योग्य ती फवारणी घेणे.

काही महत्वाचे मुद्दे-

  • सततचा पाऊस तसेच वातावरण साफ नसेल तर पानगळ शक्यतो टाळावी कारण साफ वातावरण नसेल तर पानगळ चांगल्या प्रकारे होणार नाही. वातावरण साफ झाले कि मगच पानगळ करावी.
  • आपल्या बागेला किती नवीन पालवी आहे यानुसार पानगळ करावी कि नाही हे ठरवावे. बाग लिक होऊन पालवी निघाली असेल व फुलकळी काही प्रमाणात दिसत असेल तर त्यासाठी योग्य ती फवारणी घेणे.
  • पानगळ करताना करताने काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. धुके, दैवर, झाडाच्या पानांवर  पावसाचे पाणी नसताना मारावी, व फवारणीसाठी नेहमीपेक्षा अधिक 50 ते 60 लिटर जास्त पाणी घेऊन सावकाश पानगळ करावी जेणेकरून परत पानगळ करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे पानगळ केली तर पानगळ चांगल्या प्रकारे होइल.

२)पानगळ नंतर चे व्यवस्थापन :-


  • नवीन पानगळ केलेल्या बागांनकडे विशेष लक्ष देणे तितकेच मगहात्वाचे असते. झाडांच्या पानांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कारण पाने चांगली राहिली तरच झाडांना फुले व्यवस्थित निघतील त्यामुळे पानगळ नंतर चौकी अवस्थेतील ज्या बाग असतील त्यांनी पानांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 
पानांवर डाग पडू नये उपयोजना-
  • पानांवर कुठल्याही प्रकारचे डाग पडू नये त्याकरिता खालील पैकी किमान दोन फवारणी घ्या , नंतर साधी-साधी फवारणी सुरू ठेवा जेणे करून पानांवर डाग पडणार नाहीत आणि परिणाम चांगला मिळेल.

1)Natio 0.5 ग्राम/लिटर
2)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर  + streptocycline 50 ग्राम/200 लिटर. 
3)Cabrio top 2.5-3 ग्राम/लिटर.
4)Aliette 1 ग्राम/लिटर + Antracol 2 ग्राम/लिटर
  • ज्या बागांची नवीन पानगळ केली आहे. अशा बागांना ड्रीपने तसेच स्प्रे मधून N.P.K. आणि मिक्स माइक्रोन्यूट्रिएंट दिलेले फायदेशीर राहते.

बागेत फुलकळीच निघत नाही उपयोजना:
  • बागेत जर फुलकळी पाहिजे त्या प्रमाणात निघत नसेल तर खालील उपाययोजना करणे फायदेशीर राहील.
       ड्रीपद्वारें देणे:
  • ड्रीपने 4 ते 5 kg. सल्फर एकदा व 5 kg 00:52:34 दोन वेळा सोडावे. म्हणजे फुलकळी निघण्यास मदत होईल.
       फवारणी देणे:
  • बागेत खालील प्रमाणे फवारणी घेतली तर फुलकळी निगण्यास मदत होईल.
1) 00:52:34  2.5 ग्राम/लिटर ची एक फवारणी घ्यावी.
2)बोरॉन 1 ग्राम/लिटर + माइक्रोन्यूट्रिएंट 1 ग्राम/लिटर.

बागांमधील फुटावा :
  • बागेत फुटवा जास्त प्रमाणात निघतो त्यामुळे झाड जर  गच्च भरले तर परिणामी फवारणी नीट बसत नाही तसेच फळाला अन्नपुरवठा कमी होतो.
  • बागेत फुटवा जास्त निघत असेल तर पाणी कमी करावे. तसेच फुटवा काढून घेणे देखील योग्य राहील तसेच खालील उपयोजना करने फायद्याचे राहील.
        ड्रीपद्वारें देणे:
  • 00:52:34, 5 किलो ड्रीपद्वारे सोडावे .
        फवारणी देणे:
  • खालील पैकी 1-2 फवारणी घेणे योग्य राहील.
1)0:52:34 2.5 ग्राम/लिटर
2)Tilt 0.5 मिली/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
3)Planofix 0.5 मिली/लिटर + Boron 1.5 ग्राम/लिटर.

 

 3)फुलकळी अवस्था-



  • फुल अवस्थेत जर पाऊस झाला तर खते तसेच पाणी काही प्रमाणात सुरू ठेवा.
  • बाग सध्या फुलोऱ्यात आहे. त्यांनी खालील गोष्टीकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे,
1)फुलांची गळ होणार नाही. 
2)फुलांवर डाग येणार नाही. 
3)पानांवर डाग येणार नाही.
4)झाडांची मुळी चांगली सुरु राहील इत्यादी.

 

          फुल व पानांवरील डाग उपयोजना:

  • काही बागांमध्ये फुलांवर तसेच पानांवर डाग पडणे असल्या समस्या फुलोऱ्यात उदभवतात डाग येणे बंद व्हावे तसेच नवीन फुलांवर व पानांवर येणे बंद व्हावे यासाठी खालील काही फवारणी घेऊ शकता.
  • खालील फवारणी डाग येऊ नयेत म्हणून सुद्धा उपयुक्त राहातील.
1)Natio 0.5 ग्राम/लिटर.
2)Score 0.5 मिली/लिटर + kavach 1.25 ग्राम/लिटर.
3)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर  + streptocycline 50 ग्राम/200 लिटर. 
4)Aliette 1 ग्राम/लिटर + Antracol 2 ग्राम/लिटर 
5)Contaf 1 मिली/लिटर+ captaf 2.5 ग्राम/लिटर 

 

बारीक फुल जळत आहे उपयोजना :

  • काही बागांमध्ये फुल कुणी जळून गळते असल्या समस्या साठी खालील पैकी एक फवारणी घेणे फायदेशीर राहील,

        
        1)Roko 1 ग्राम/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
        2)Bavistin 1 ग्राम/लिटर + Cuman-L 2.5 मिली/लिटर.
        3)Natio 0.5 ग्राम/लिटर. 

         झाडाची पांढरी मुळी:
  • काही बागांमध्ये  पांढऱ्या मुळी दिसत नाही अश्या बागांना सल्फर 4 ते 5 किलो/एक्कर ड्रीप ने द्यावे जेणे करून पांढरी मुळी चांगली चालण्यास मदत होईल.

4)बागेच्या सेटिंग नंतर (फळ लिंबू आकाराचे झाले आहे)

 
  • पावसाळ्यात  येणारा पाऊस तसेच वातावरण ढगाळ असेल तर बागेमध्ये फळांवर डाग येऊ नये म्हणून खालील फवारणी घेत चला .
  • सतत  एका मागे एक खालील फवारणी घेतली तरी नंतर बुरशी रोगराई कंट्रोल होत नाही. त्याकरिता 2-3 साध्या फावारण्या झाल्या की मग खालील एक फवारणी घ्या.
1)Natio 0.5 ग्राम/लिटर.   
2)Score 0.5 मिली/लिटर + kavach 1.25 ग्राम/लिटर.
3)Contaf 1 मिली/लिटर + captaf 1.50 ग्राम/लिटर.
4)Score 0.5 मिली/लिटर. + Kocide 1 मिली/लिटर.  
5)custodia 1.25 मिली/लिटर.
6)Blue Coper 2.5 ग्राम/लिटर + Bromopol 50 ग्राम/200 लिटर
7)Kitazin 1 मिली/लिटर + M45 2 ग्राम/लिटर.

  • बागेमध्ये सतत खूप प्रमाणात पाऊस होत असेल तर कॉपर+सल्फर ची डस्टिंग बेडवर करणे फायद्याचे राहील.